Astro Trushna

Astro Trushna Astrologer
collaborater

(1)

01/06/2026

जपमाळेवर (१0८ मणी) नामजप करणे ही एकाग्रता वाढवण्याची आणि देवतेच्या आशीर्वादाची एक पवित्र पद्धत आहे. सकाळी अंघोळ करून स्वच्छ आसनावर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. उजव्या हाताच्या मधल्या बोटावर माळ ठेवून अंगठ्याने मणी स्वतःकडे ओढून जप करावा.

j*p malevar j*p kasa karava
जपमाळेवर (१0८ मणी) नामजप करणे ही एकाग्रता वाढवण्याची आणि देवतेच्या आशीर्वादाची एक पवित्र पद्धत आहे. सकाळी अंघोळ करून स्वच्छ आसनावर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. उजव्या हाताच्या मधल्या बोटावर माळ ठेवून अंगठ्याने मणी स्वतःकडे ओढून जप करावा.
जपमाळेचे महत्त्वाचे नियम (How to Use Japamala):माळ धरण्याची पद्धत: मधल्या बोटावर माळ ठेवून अंगठ्याने मणी ओढावेत.
तर्जनी (index finger) बोटाचा वापर करू नये.मेरुमणी (सुरुवातीचा मोठा मणी): जप करताना मेरुमणी ओलांडू नये. १०८ मणी पूर्ण झाल्यावर माळ उलटी करून (फिरवून) पुन्हा जप सुरू करावा.मण्यांचा आवाज: जप करताना माळेचे मणी एकमेकांवर आपटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मणी आपटल्यास जप व्यर्थ जाऊ शकतो.
माळ झाकणे: जप करताना माळ गोमुखात (पिशवीत) किंवा कपड्याने झाकून ठेवावी, ती उघडी ठेवू नये.
जप संख्या: एका माळेत १०८ मणी असतात, त्यामुळे एक माळ म्हणजे १०८ मंत्रांचा जप.
योग्य माळेची निवड (Types of Mala):तुळशीची माळ: विष्णू, राम, कृष्ण किंवा वैष्णव मंत्रांसाठी.रुद्राक्षाची माळ: शिव, गणपती किंवा दुर्गा मंत्रांसाठी.स्फटिकाची माळ: लक्ष्मी, सरस्वती किंवा देवीच्या उपासनेसाठी
महत्त्वाच्या टिप्स:जप सुरू करण्यापूर्वी माळेवर गंगाजल किंवा साधे पाणी शिंपडून ती शुद्ध करावी.जप करताना माळ हातातून खाली पडणार नाही, याची काळजी घ्यावी.
Astro Trushna



゚viralfollowersシ゚

31/05/2026

निशब्द..

आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती.
“अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते...? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आलोय... चूल, स्वयंपाक, झाडू-पोछा... एवढंच ना! आणि वरून तिचं हे दुखतं, ते दुखतं... नाटकच चाललेलं असतं जणू! जसं आम्ही कधी कामच केलं नाही...”

आणि माझ्या बायकोला सांगायला गेलो तर ती सरळ तोंड करून बोलायलाही तयार नव्हती. फक्त शांतपणे सगळं ऐकत होती.

अशावेळी... मला आईचंच बोलणं खरं वाटलं. खरंच तर आहे... आईसुद्धा किती काम करायची आधी... पण माझ्या बायकोचं मात्र वेगळंच नाटक आहे... पण मी तरी काय करणार? दोघींमध्ये भरडला जाणार तर मीच होतो. म्हणून बायकोशी बोलायला तिच्या मागे गेलो.

मीही रागात बोलून गेलो,
“अगं, कितीसं काम असतं? मला बघ... सकाळपासून बाहेर असतो, दिवसभर काम करतो... संध्याकाळी थोडा आराम करावा म्हटलं तर तुझी कटकट सुरू असते.”

पण बायको काही ऐकणाऱ्यांपैकी नव्हती. समोर आईही नव्हती की बोलताना तिला काही संकोच वाटेल. ती म्हणाली,
“ठीक आहे पतिदेव... एक दिवस तुम्ही माझं आयुष्य जगून बघणार का?”

मीही म्हणालो,
“ठीक आहे! करीन. त्या दिवशी तू काहीच काम करू नकोस. फक्त बसून राहा. दिवसभर इकडे-तिकडे शेजाऱ्यांकडे जाणं, उरलेल्या वेळेत माहेरच्यांशी फोनवर बोलणं... हे सगळं बंद केलंस तर दोन तासांत काम संपेल.”

बायको एकदा हसली आणि म्हणाली,
“नाही नाही पतिदेव... तुम्हाला पूर्ण घरकाम करायचं नाहीये. फक्त माझ्या वाट्याचे तीनच काम करायचे आहेत.”

“फक्त तीन कामं...? सांग बरं कोणती?” मी विचारलं.

ती म्हणाली,
“पहिलं काम — मी कपडे धुवेन, तुम्ही फक्त ते वाळत टाका.
दुसरं — मी भांडी घासेन, तुम्ही फक्त ती जागेवर लावा.
आणि तिसरं — मी घर झाडून-पुसून घेईन, तुम्ही फक्त कचरा टाका.”

मी मिश्किल हसत म्हणालो,
“तू पण ना... तुला आरामाची चांगली संधी देत होतो, तीच घालवते आहेस. चालेल, उद्या तयार राहतो.”

---

सकाळ झाली. सगळ्यांचा चहा-नाश्ता झाला. त्यानंतर बायकोने सगळी भांडी धुवून टोपलीत ठेवली.

मी ती लावायला पुढे गेलो, तर ती म्हणाली,
“अहो अहो पतिदेव... आधी भांड्यांवरचं पाणी निथळू द्या. मग हे चिनी कप तिकडे समोर ठेवायचे. आणि हो, आधी कपड्याने पुसून घ्या. या प्लेट्स सिंकखालच्या कपाटात ठेवायच्या. त्या वेगळ्या-वेगळ्या ठेवा, एकावर एक ठेवल्या तर त्यात ओलसरपणा येतो. आणि ही चहाची किटली खिडकीजवळ उन्हात ठेवा म्हणजे वास जाईल. आणि आईंचा औषधाचा ग्लास त्यांच्या खोलीत नीट कोरडा करून ठेवायचा.”

मी तिचं सगळं ऐकत भांडी लावायला लागलो. भांडी लावत लावत पंधरा मिनिटं कधी गेली समजलंच नाही. काय करणार... चिनी मातीची भांडी होती... जपून ठेवावी लागत होती. फुटली तर? रोज आई माझ्या बायकोला बोल लावते... आज मला ऐकावं लागू नये म्हणून भीती वाटत होती.

---

नंतर बायकोने झाडू काढला आणि कचरा तसाच ठेवला.

मी कचरा टाकायला निघालो तर ती म्हणाली,
“पतिदेव, कचरा वेगळा टाका. ओला कचरा वेगळा, सुका वेगळा. आणि किचनमध्ये भाजी साफ केली होती ना, त्यातलं गवत, देठ वगैरे खाली गाईला टाका. सोबत कालच्या पोळ्याही ठेवल्यात.”

मी एका हातात ओला कचरा, दुसऱ्या हातात सुका कचरा आणि किचनचा कचरा घेऊन अंगणात आलो. कॉलनीत आधीपासूनच गाय उभी होती. तिला पोळी खाऊ घालायला लागलो तर तिने थोडं खाल्लं, थोडा कचरा पसरवला. पुन्हा झाडू घेऊन साफ करावं लागलं.

कचऱ्याच्या गाडीचा आवाज येत होता — “गाडीवाला आला, घरचा कचरा काढा...” पण गाडी अजून आली नव्हती. बहुतेक प्रत्येक ठिकाणी थांबत येत असावी. म्हणून बाहेर उभा राहिलो. एकटं उभं राहून कंटाळा आला म्हणून मोबाईल काढून बोलायला लागलो.

पाच... दहा मिनिटांनी गाडी आली. कचरा टाकून परत घरात आलो.
अजून १५-२० मिनिटं गेली होती...

---

थोडा वेळ बसलो. बायको सगळ्या खोल्यांतून कपडे गोळा करत होती धुण्यासाठी.

मी विचार केला, “आता कपडे धुवायला वेळ लागेल, तोपर्यंत थोडा आराम करतो.”

इतक्यात बाथरूममधून धपाधप आवाज यायला लागला. असं वाटत होतं जणू ती कपडे धुत नव्हती... दिवसाचा सगळा राग त्यांच्यावर काढत होती.

मी रागाने बाथरूमजवळ गेलो आणि म्हणणारच होतो,
“राग काढायचाच असेल तर माझ्यावर काढ...”
तेवढ्यात पाहिलं तर ती माझीच जीन्स घासत होती, ज्यावर काल मी भाजी सांडली होती.

मी माझे शब्द तोंडातच गिळले...

---

थोड्या वेळाने ती दोन बादल्या कपडे घेऊन आली आणि म्हणाली,
“हे वाळत टाका. आणि हो, ही साडी सावलीत टाका, रंग जातो तिचा. आणि हे शर्ट-पॅन्ट उलटे करून टाका म्हणजे रंगही जाणार नाही आणि ऊनही लागेल. सगळ्या कपड्यांना क्लिप लावा. आणि दूर-दूर टाका म्हणजे नीट वाळतील. कधी पाऊस येईल सांगता येत नाही.”

मी फक्त मान हलवत छतावर गेलो.

छतावर जाऊन एकेक कपडा वेगळा टांगायला लागलो. पॅन्ट उलटी केली... शर्टची बटणं लावली... कपडे टांगताना पाहिलं तर कॉलरवरचे आणि पॅन्टवरील डाग गेले होते. मनोमन बायकोचं कौतुक वाटलं.

मुलांचे छोटे छोटे कपडे वाळत घालणं तर फार अवघड वाटलं. जसा टाकायचो तसाच वाऱ्याने उडायचा. एका हाताने कपडा पकडायचा, दुसऱ्याने क्लिप लावायची. कसाबसा अर्धा तास गेला.

इतक्यात शेजारच्या आजीही त्यांच्या छतावर आल्या. आता त्यांना नमस्कार करणं भाग होतं. दुर्लक्ष करून निघालो असतो तर काय विचार केला असता कोण जाणे! म्हणून त्यांच्याशीही थोडं बोलावं लागलं.

---

खाली आलो तर बायकोने स्वयंपाक करून ठेवला होता. सिंकमध्ये पुन्हा भांड्यांचा ढीग जमा झाला होता. कढई, तवा, चमचे, मिक्सरचा जार, लाटणं, पाट... मध्येच चहाचे कप पुन्हा आलेले.

तिने सगळी भांडी धुतली आणि सगळ्यांना जेवण वाढायला लागली.

सगळे जेवले आणि पुन्हा सिंकमध्ये भांड्यांचा ढीग जमा झाला.

मी सकाळची भांडीच लावत होतो, तोपर्यंत तिने दुसरी भांडी धुवून ठेवली आणि दयाळूपणे म्हणाली,
“आता राहू द्या... दुपारी लावा.”

मी पाहिलं... सकाळपासून ती एकदाही बसली नव्हती. फोनलाही हात लावला नव्हता.

मी थोडं हसत विचारलं,
“काय गं, आज एकदाही फोन घेतला नाहीस?”

ती हलकंसं हसून म्हणाली,
“तुम्हालाच तर फोन करते मी... आज तुम्ही घरी आहात, मग कशाला करू?”

मी म्हणालो,
“का? माहेरी कोणाला फोन करत नाहीस? आई तर म्हणते दिवसभर मोबाईलवर असतेस.”

ती निर्विकारपणे म्हणाली,
“माझ्यासारख्याच माहेरच्या बायका पण कामात व्यस्त असतात. सणासुदीला थोडं बोलणं होतं. आई म्हणाल्या ते बरोबरच म्हणाल्या... मुलांच्या ट्युशनवाले, गॅसवाले, डिशवाले, कुरिअरवाले... अर्धी कामं आजकाल मोबाईलवरच होतात.”

---

मुलं शाळेतून आली. तिने पुन्हा गॅस लावला. मुलांच्या आवडीचं खायला केलं. टिफिन पुन्हा सिंकमध्ये आले. प्लेट्स जमा झाल्या. तिने त्या धुतल्या.

मग पुन्हा झाडू काढला. दुसऱ्यांदा घर झाडत होती.

इतक्यात आईचा आवाज आला — “चहा कर!”

ती चहा करायला गेली. पुन्हा चहाची भांडी सिंकमध्ये.

मुलांचे शाळेचे कपडे बाथरूममध्ये आले. ती पुन्हा कपडे धुवायला लागली. दुसऱ्या दिवशी शाळेत तेच घालायचे होते.

मी किचनमध्ये धुतलेल्या भांड्यांचा ढीग पाहूनच घाबरत होतो... इतक्यात ती मुलांचे कपडे घेऊन आली आणि म्हणाली,
“हे वाळत टाका.”

---

असं करत करत पूर्ण दिवस गेला.

संध्याकाळचा नाश्ता झाला. पुन्हा भांडी.
रात्रीचं जेवण झालं. पुन्हा भांडी.

संपूर्ण दिवस हेच चक्र सुरू होतं.

आता मीच या कामाला कंटाळलो होतो.

खरंच... मला बायकोची दया आली.

ज्या गोष्टी फक्त वाळत टाकताना मला आळस येत होता, त्या ती आधी धुते, घासून चमकवते, मग वाळवते, नंतर इस्त्री करून जागेवर ठेवते.

रोज रोज हे सगळं करून ती किती कंटाळली असेल...

आणि काही वर्षांपासून तर तिने माझ्याकडे काही मागणंसुद्धा बंद केलं होतं.

कुठेतरी तिच्या या शांत स्वभावामुळे मलाच ती गर्विष्ठ वाटायला लागली होती...

---

रात्री मी तिला म्हणालो,
“आज मला कळलं तू दिवसभर किती काम करतेस... आणि किती नीट करतेस.”

“पण एक सांग... तू माझ्या आईशी नीट बोलत का नाहीस? त्यांची काळजी घेतेस तरी त्या तुझ्यावर रागावलेल्या का असतात?”

ती म्हणाली,
“आज तुम्ही एक दिवस माझ्या वाट्याचं थोडंसं काम केलं, तेव्हा तुम्हाला माझी अवस्था कळली.

आईजी तर हे आयुष्य स्वतः जगलेल्या आहेत. रोज स्वतःच्या डोळ्यांनी मला पाहतात... तरी समाधानी नसतात. चुका काढतात. माझ्या शरीराच्या वेदनांना नाटक समजतात...

सांगा बरं... मी किती वेळा स्वतःची सफाई देत राहू?

बोलले तर उद्धट...
न बोलले तर गर्विष्ठ...

त्यांचं एकच असतं — ‘आमच्या काळात... आमच्या काळात...’

पण पतिदेव... काळ निघून जातो... बदलतोही.

पण आयुष्य जगायचं असतं... ते कोणाच्या मर्जीप्रमाणे बदलत नाही.

त्यांच्या काळात गोष्टी वेगळ्या होत्या... आपल्या काळात वेगळ्या आहेत...

त्या अजूनही भूतकाळात जगत आहेत... आणि मी आजमध्ये जगते आहे.”

---

एका स्त्रीला वाईट तेव्हा वाटत नाही जेव्हा एखादा पुरुष तिला कमी लेखतो... कारण पुरुषाला कदाचित कल्पनाही नसते की जबाबदाऱ्या पेलता पेलता ती त्याच्या वयापेक्षाही कितीतरी मोठी झालेली असते.

जेव्हा तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, तेव्हाच तिचं लग्न लावलं जातं...

जेव्हा ती घर सांभाळायला शिकते, तेव्हाच मुलांची जबाबदारी येते... आणि ती स्वतः अजून मनाने लहानच असते...

आणि जेव्हा ती घर आणि मुलं दोन्ही सांभाळायला शिकते...

तेव्हा तिच्याकडून अपेक्षा केली जाते की आता पैसेही कमवावेत...

पण तेवढा आत्मविश्वास तिच्यात उरलेला असतो का?

तो तर कधीच तिच्या जवळच्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उणेदुणे काढून संपवलेला असतो...

आणि ती समाजात फक्त उपहासाचा विषय बनून राहते... फक्त म्हणून की ती चार भिंतींच्या आत राहते.

खरं तर, हे आमच्या स्त्रियांचं रोजचंच आयुष्य आहे...

म्हणूनच एका वेळेनंतर आम्ही स्वतःबद्दल स्पष्टीकरण देणं सोडून देतो...

आणि शांततेलाच आपला दागिना मानून अंगावर चढवतो...

स्त्रीला खर्‍या अर्थाने वाईट तेव्हा वाटतं... जेव्हा एक स्त्रीच तिची किंमत ओळखत नाही...

बायकोचं बोलणं ऐकून मी नि:शब्द झालो...

मयुरी 🖋️
Cp

31/05/2026

Cp
*भारतातील निवृत्त लोकांना त्यांनी आयुष्यभर साठवलेले पैसे खर्च करता का येत नाहीत?*

ते टंचाईच्या भारतात वाढले, रेशन कार्ड, फोनसाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागायची, आणि नोकरीची स्थिरता हीच सर्वात मोठी गोष्ट मानली जायची. ४० वर्षे त्यांनी सरकारी किंवा कॉर्पोरेट नोकरीत प्रामाणिकपणे काम केले. ऑटोचा खर्च वाचवण्यासाठी बसस्टॉपपर्यंत चालत जायचे. शर्ट फाटेपर्यंत वापरायचे. मुलांच्या IIT कोचिंगसाठी आणि भव्य लग्नासाठी त्यांनी सुट्ट्या त्यागल्या.
आज, साठाव्या वर्षी, त्यांच्या नावावर चांगल्या भागात स्वतःचे घर आहे आणि ₹३ कोटींहून अधिकचा निवृत्ती निधी FD, PPF आणि म्युच्युअल फंडमध्ये आहे.
ते खेळ जिंकले आहेत. ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत.
पण आजही मे महिन्याच्या उष्णतेत ते घामाघूम होऊन उठतात आणि एसी एक तास चालवल्यानंतर बंद करतात का ? तर , "वीज वाया कशाला घालवायची ?"...

हीच आधुनिक भारतीय निवृत्त व्यक्तीची शोकांतिका आहे. ते मालमत्तेत श्रीमंत आहेत, पैशात श्रीमंत आहेत, पण जीवनशैलीत गरीब आहेत.

यालाच आर्थिक मानसशास्त्रात “Switch Failure” (खर्च करण्याची अक्षम्यता) म्हणतात.
*सतत बचत करणाऱ्या मनाची मानसिकता:*
३५-४० वर्षे त्यांच्या मेंदूमधील स्विच “SAVE” वरच अडकलेला असतो. प्रत्येक आर्थिक निर्णय हा साठवणुकीच्या दृष्टीने घेतला गेलेला असतो. बचत ही फक्त सवय नसते ; त्या काळात ती जगण्यासाठीची गरज असते !....

आणि निवृत्तीच्या दिवशी अचानक त्यांना सांगितले जाते—आता हा स्विच “SPEND” वर करा.
पण ते त्यांच्या हातात नसते.
४० वर्षांच्या काटकसरीने तयार झालेले "न्यूरल पाथ वे" इतके मजबूत असतात की खर्च करणे म्हणजे त्यांना अपराधासारखे किंवा वेदनादायक वाटते.
जणू त्यांनी आयुष्यभर वाढवलेले झाड ते स्वतःच तोडत आहेत!....

भारतातील “Switch Failure” ची लक्षणं
अनेक घरांमध्ये / कुटुंबामध्ये दिसून येतात.

*FD व्याजाचा सापळा:*
ते फक्त FD वरचे व्याजच खर्च करतात. मूळ रक्कम वापरणे म्हणजे पाप वाटते. महागाई वाढत असताना त्यांची जीवनशैली कमी होत जाते.
*वैद्यकीय उपचार टाळणे:*
बँकेत कोट्यवधी रुपये असूनही, ते गुडघ्याचे ऑपरेशन किंवा मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुढे ढकलतात कारण त्यांना तो खर्च जास्त वाटतो.

*प्रवासातील विरोधाभास:*
७० व्या वर्षीही, ते 2AC किंवा फ्लाइटऐवजी—Sleeper क्लासने प्रवास करतात, याचं उत्तर त्यांच्याकडे तयार असतं.....“फ्लाइट कशाला ? ट्रेन सुद्धा त्याच स्टेशनवर पोचवतेच ना !! ”.
*वारसांचा दबाव:*
संपूर्ण संपत्ती मुलांसाठी जपून ठेवण्याची मानसिकता. स्वतः काटकसरीत जगतात, जेणेकरून ४५ वर्षांच्या आणि स्वतःच्या आयुष्यात स्थिरावलेल्या मुलांना मोठी संपत्ती मिळेल.....

*मोठी भीती :*
त्यांच्या मनात खोलवर भीती असते...... मी जास्त जगलो तर? पैसे संपले तर?

महागाईने रुपयाची किंमत कमी होताना त्यांनी पाहिलेली असते . त्यांना वाटते ₹३ कोटी आज पुरेसे असले तरी २० वर्षांनी हॉस्पिटलचा खर्च प्रचंड असेल !....

या भीतीमुळे ते काटकसरीचा अतिरेक करून सर्वात वाईट परिस्थितीसाठीची तयारी सुरू करतात आणि त्यामुळे आयुष्यातील सर्वोत्तम क्षण गमावतात.

*_अंतिम परिणाम: @ सर्वात श्रीमंत मृतदेह..._*

या “Switch Failure” चा शेवट म्हणजे त्यांच्या वाट्यास येते ते न जगलेले आयुष्य !!......

वयाच्या ३०, ४०, ५० व्या वर्षीही त्यांनी भविष्याचा विचार करून सुखाचा त्याग केलेला असतो. पण जेव्हा तो दिवस येतो, तेव्हा ते त्या सुखाचा आनंद घेऊ शकत नाहीत.

ते कब्रस्तानातील सर्वात श्रीमंत लोक बनतात. आणि मागे ठेवतात ती मोठी बँक बॅलन्स, स्वतः न वापरता भाड्याने दिलेलं घर, आणि लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने.

आणि शेवटच्या प्रवासाला निघताना बरोबर घेऊन जातात ते स्वतःसाठी न घेतलेले आनंद, न केलेले प्रवास आणि न केलेली उदारता किंवा दानशूरता यांचा पश्चात्ताप !!....

*स्विच कसा बदलायचा?Permission to Spend Fund:*
एक वेगळे खाते उघडा. त्यातील पैसे फक्त आनंदासाठी खर्च करायचे ते वाचवायचे नाहीत....

*Bucket Strategy:*
पैसे दोन भागांत विभागा—
A: सुरक्षित (जगण्यासाठी)
B: जीवनाचा आनंद घेण्यासाठी

*वारसांविषयीचा दृष्टिकोन बदला:*
मुलांसाठी सर्वात मोठी भेट म्हणजे त्यांना आनंदी, स्वतंत्र आणि स्वावलंबी पालक दिसणे.

*अंतिम निष्कर्ष :*
पैसा म्हणजे साठवलेली ऊर्जा आहे.

तुम्ही आयुष्यभर ही ऊर्जा साठवली. जर ती तुम्ही आनंद, सुख आणि अनुभवात रूपांतरित केली नाही, तर ती वाया जाईल.

तुम्ही ३५-४० वर्षे काम केलेत ते काय फक्त हॉस्पिटलमध्ये श्रीमंत पेशंट होण्यासाठी नाही!.....

स्विच बदला, स्वतः वर खर्च करा. आताही मन मारू नका. कमावलेल्या पैशांचा उपभोग घ्या. कारण ते तुम्ही कमावले आहे.

*सर्वात श्रीमंत मृतदेह होण्यासाठी जगू नका.*🤷🏻‍♂️🙏🏻

30/05/2026
Water element zodiac sign राशीचक्रातील जल राशी—कर्क, वृश्चिकआणि मीन—त्यांच्या सखोल भावनिक बुद्धिमत्ता, अंतर्ज्ञान आणि सं...
30/05/2026

Water element zodiac sign
राशीचक्रातील जल राशी—कर्क, वृश्चिकआणि मीन—त्यांच्या सखोल भावनिक बुद्धिमत्ता, अंतर्ज्ञान आणि संवेदनशीलतेसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या तत्वाप्रमाणेच, त्या प्रवाही, जुळवून घेणाऱ्या असतात आणि कोणत्याही परिस्थितीतील अव्यक्त गहनता जाणू शकतात.

जल राशीकर्क (२१ जून – २२ जुलै): प्रमुख जल राशी. पालनपोषण करणारी, संरक्षक आणि घर व कुटुंबाशी घट्ट नाते असलेली.
वृश्चिक (२३ ऑक्टोबर – २१ नोव्हेंबर): स्थिर जल रास. तीव्र, उत्कट आणि अत्यंत निष्ठावान, तसेच चुंबकीय व्यक्तिमत्त्वाचीमीन (१९ फेब्रुवारी – २० मार्च): परिवर्तनशील जल रास. स्वप्नाळू, कलात्मक आणि अत्यंत सहानुभूतीशील, तसेच प्रबळ मानसिक किंवा अंतर्ज्ञानात्मक क्षमता असलेले.मुख्य वैशिष्ट्येभावनिक खोली: ते गोष्टी तीव्रतेने अनुभवतात आणि वरवरच्या नात्यांपेक्षा खोल, अर्थपूर्ण नात्यांना प्राधान्य देतात.अत्यंत अंतर्ज्ञानी: ते अनेकदा आपल्या अंतर्मनाच्या आवाजावर अवलंबून असतात आणि खोलीतील ऊर्जेतील बदल जाणू शकतात.सहानुभूतीशील: ते नैसर्गिकरित्या त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या भावना आत्मसात करतात, ज्यामुळे ते करुणामय श्रोते आणि काळजीवाहू बनतात.सृजनशील: त्यांचे समृद्ध आंतरिक जग अनेकदा प्रभावी कलात्मक अभिव्यक्तीमध्ये रूपांतरित होते.
Astro Trushna
घटक सुसंगततासर्वोत्तम जोड्या: जल राशींची जोडी सहसा पृथ्वी राशींसोबत (वृषभ, कन्या, मकर) उत्तम जमते. पृथ्वी तत्त्व स्थिरता आणि आधार देते, ज्यामुळे जल राशीच्या भावनांचा ओघ नियंत्रित ठेवण्यास आणि त्याचे संगोपन करण्यास मदत होते.तसेच सुसंगत: इतर जल राशी. या जोड्या भावनिकदृष्ट्या अत्यंत जुळलेल्या असतात, परंतु योग्य मर्यादांशिवाय कधीकधी त्या अतिरेकी ठरू शकतात.आव्हाने: त्यांना अग्नी आणि वायू राशींसोबत अनेकदा संघर्ष करावा लागतो. अग्नी राशीमुळे भावनिक गोंधळ निर्माण होऊ शकतो, तर वायू राशी कधीकधी जल राशीला आवडेल त्यापेक्षा जास्त भावनिकदृष्ट्या अलिप्त वाटू शकते.

टीप: ज्योतिषशास्त्र गुंतागुंतीचे आहे; तुमच्या मूळ व्यक्तिमत्त्वात संपूर्ण जन्मपत्रिकेचा समावेश असतो, त्यामुळे इतर तत्त्वांमधील स्थाने (जसे की तुमची चंद्र किंवा लग्न रास) तुमच्या जल राशीच्या अभिव्यक्तीला आकार देऊ शकतात.
゚viralfollowersシ゚


Cp प्रयाग राज railway station वर गाडीची वाट पाहत बसलेले हे पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद. ह्यांच्या बुद्धिमत्तेचा ...
28/05/2026

Cp
प्रयाग राज railway station वर गाडीची वाट पाहत बसलेले हे पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद. ह्यांच्या बुद्धिमत्तेचा थोडासा परिचय करून देतो.
इस्रो त्यांच्या कन्सल्टन्सी ची मदत वेळोवेळी घेत असतो.

अमेरिकन स्पेस एजन्सी देखील त्यांची कन्सल्टन्सी घेतली आहे. तसेच advisory board वर त्यांचे नाव लिहिले आहे.

वर्ल्ड बँकेने त्यांची मदत घेवून आर्थिक गोष्टी कश्या सोडवायच्या ह्या बाबतीत वैदिक गणिताच्या साहाय्याने त्यांनी प्रश्नांची उकल करून दाखवली आहे.
ऑक्सफर्ड आणि केंब्रिज येथील गणित तज्ञ त्यांची सेवा घेतात. भारतात देखील आयआयटी आणि आयआयएससी देखील त्यांच्याशी संपर्क साधून आहेत.
अत्यंत साधी राहणी ह्या ऋषींची आहे.
हा त्यांचा अत्यंत अल्प परिचय आहे.

त्यांनी अनेक शास्त्रीय पुस्तके लिहिली आहेत. ह्या वरून विचार करा की आपले जे पूर्वज ऋषी मुनी होते ते किती अभ्यासू. ते स्वतः बिहार मधील आहेत. *आपणास विनंती आहे की गोवर्धन मठ ही वेब साईट जरूर पहा.* मानवी जीवनास जी लोकं उच्च तर सुखात आणण्याचा प्रयत्न करत असतात. ते प्रसिध्दी मिळवत नसतात आणि त्यांना कोणते ही राजकीय पाठबळ नसते. किंबहुना ते कोणताही रांग लावून लोकांना फसवत नसतात. अत्यंत साधं जीवन जगतात (कौपी पेस्ट)

25/05/2026

नौतपा

नौतपा 2026 की शुरुआत 25 मई से हो रही है, जो 2 जून 2026 तक चलेगा। इस दौरान सूर्य रोहिणी नक्षत्र में प्रवेश करते हैं, जिससे धरती पर भीषण गर्मी (9 दिनों तक) पड़ती है। ज्योतिष के अनुसार, इन 9 दिनों में सूर्य की तीव्र ऊर्जा के साथ 7 बड़े ग्रहों (मंगल, शुक्र, राहु-बुध) की चाल भी बदलेगी, जिसका सीधा असर सभी 12 राशियों पर पड़ेगा।नौतपा 2026 मुख्य विवरण

(Nautapa 2026 Date and Time):शुरुआत: 25 मई 2026, सोमवारसमापन: 2 जून 2026, मंगलवारज्योतिषीय आधार: सूर्य देव का रोहिणी नक्षत्र में गोचर।मौसम: इन 9 दिनों में तापमान अपने चरम पर रहता है।नौतपा ज्योतिष और राशियां

मेष
(Nautapa 2026 Astrology Predictions):मेष राशि (Aries): आर्थिक पक्ष मजबूत होगा, लेकिन स्वभाव में उग्रता आ सकती है।वृषभ राशि (Ta**us): कार्यक्षेत्र में प्रभाव बढ़ेगा, लेकिन स्वास्थ्य (सिरदर्द) का ध्यान रखना होगा।प्रभाव: इस बार मंगल, गुरु, बुध और शुक्र का नक्षत्र/राशि परिवर्तन होने से कुछ राशियों के लिए यह समय आर्थिक लाभ और तरक्की के लिए वरदान साबित हो सकता है।
मिथुन
सावधानी: मिथुन, कर्क, सिंह और वृश्चिक जैसी राशियों को स्वास्थ्य, वाद-विवाद और आर्थिक मामलों में संभलकर रहने की सलाह है।
नौतपा में क्या करें (Nautapa Remedies & Tips):जल दान: पानी, शरबत या मटके का दान करना बेहद पुण्यदायी माना जाता है।प्याऊ: राहगीरों के लिए पीने के पानी की व्यवस्था (प्याऊ) करना शुभ है।

सूर्य देव की पूजा: सूर्य मंत्र का जाप करें।नोट: नौतपा के दौरान उत्तर और मध्य भारत में भीषण गर्मी की संभावना है, इसलिए स्वास्थ्य के प्रति सतर्क रहें।

Address

Dombivali
Mumbai
421201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Astro Trushna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share