25/05/2024
वदनी कवळ घेता....
जेवायच्या आधी शाळेत सक्तीने म्हटला जाणारा श्लोक...एका विशिष्ट लयीत.. चालीत..आवडणारा..
आज हे आठवायला कारण ही तसे वेगळेच घडले .थोडेसे वेगळे पण चकित करणारे...
दुपारचा साधारण दीड वाजला असावा..रस्त्याच्या कडेला हाताने चालवायच्या लाकडी घाण्यासारख्या यंत्राने ऊसाचा रस काढून देणाऱ्या एका कुटुंबाला हा श्लोक म्हणताना ऐकले आणि क्षणभर थांबलोच
नवरा बायको आणि त्यांची पाच सहा वर्षाची छकुली..एका सुरात हा श्लोक म्हणत होते..म्हणून झाल्यावर समोर वाढलेल्या डब्यातल्या अन्नाला नमस्कार करून यांनी जेवायला सुरुवात केली..
कुतुहलाने मी विचारलेच..काय दादा?? हल्ली हा श्लोक फारसा ऐकू येत नाही..बरे वाटले ऐकून..
अन्नाचा आदर करणे हे माझ्या आई बाबांना कुणी शिकवले होते माहित नाही..पण लहानपणापासून हे मनात बिंबले आहे..आणि माझ्या वाट्याला दोन वेळचे अन्न येतेय ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट आहे याची जाणीव सुद्धा आहे आम्हाला..इतके बोलून हलकेसे हसले दादा..
मी पुढे निघालो..ही जाणीव आहे आम्हाला हे काही केल्या डोक्यातून जाईना..
खरेच ही जाणीव महत्वाची आहेच ना?? सारी धडपड..मेहनत..कष्ट ज्या अन्नासाठी सुरू आहे त्याची जाणीव असायला हवी हे त्या दादा आणि त्याच्या कुटुंबीयांना किती व्यवस्थित कळलेले आहे ..
मला सर्व साधारण घरातला सध्याचा जेवण करण्याचा सोपस्कार सर्रकन डोळ्यासमोर आला..
समोर टीव्ही..एका हातात मोबाईल पाहणे सुरू आणि दुसऱ्या हाताने जेवण..काय यातले महत्वाचे वाटतंय हे वेगळे सांगायची गरज नाही..
बदलणाऱ्या काळात सगळ्यात काय बदलले असेल तर या छोट्या छोट्या परंतु अतिशय महत्त्वाच्या जाणीवा...
या जाणीवा बदलून चालायचे नाही..आपण यंत्र नाही..वंगण मिळाल्यासारखे जेवण घेणे आणि मशीन प्रमाणे ऑपरेट होत राहणे हे आपले संस्कार नाहीत..आणि संस्कृती ही नाही..त्या अन्नाचा आदर करणारी आपली पूर्वापार चालत आलेली संस्कृती ...अन्नाला पूर्णब्रह्म मानणारी..आदर तर हवाच..
फक्त आदर करण्याबरोबरच काही व्यक्ती आपले आयुष्य पणाला लावतात म्हणून हे अन्न ग्रहण करतोय आपण ही जाणीव सुद्धा हवीच.. आत्महत्या आणि आर्थिक संकटाचा सामना करत..दिवसरात्र घाम गाळत आपल्या शेतात भाज्या,तांदूळ ,गहू यांचे पीक घेणारा शेतकरी..आपण सुखात..स्वातंत्र्य अनुभवत समाधानात दोन घास खावेत म्हणून उणे चाळीस अंश इतक्या बोचणाऱ्या थंडीत आपल्या सीमेचे रक्षण करणारे जवान..खूप जणांचे योगदान..या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त होऊन आणि अन्नाचा आदर करणाऱ्या श्लोकाचे पठण करून अन्नग्रहण करणे ही प्रथा असायला हवी असे माझे मत आहे..
कितीतरी कष्ट आणि कितीतरी दमवणाऱ्या प्रक्रियेच्या आतून गेल्यानंतर मिळणारे फलित म्हणजे अन्नग्रहण..ते बनवणाऱ्या माऊलीच्या कष्टांचाही आदर असायलाच हवा..अन्यथा फक्त सोपस्कार राहिला तर दर्शनी ते साधे वाटत असेल तरी त्याचे दूरगामी परिणाम मात्र निश्चितपणे योग्य नसतील..
सहज उपलब्ध झालेय म्हणून त्याचा अनादर करणे..फुकट घालवणे.. अन्न पदार्थाना घेऊन त्यांची नासाडी करणे हे प्रकार फोफावत जात असलेल्या वातावरणात अन्नाचा आणि ते आपल्या पर्यंत पोचण्यात ज्या व्यक्तींचे योगदान आहे त्या सर्वांप्रती कृतज्ञता..आदर ..चवीचा आनंद..तृप्ती या सोबत अन्नग्रहण होत असेल तर तो मंगल सोहळा असेल रोज... वदनी कवळ घेता...या श्लोकाने सुरू होणारा...
- विनय वाघ
मराठी माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व स्तरांवर उपलब्ध असलेल्या मार्गदर्शनासाठी ....जॉईन करा.. हा ग्रुप कुणाचीही खाजगी माहिती किंवा नंबर सुद्धा कुणाशी शेअर करत नाही..
सहज सारथी परिवार व्हॉट्सॲप कम्युनिटी :
https://chat.whatsapp.com/FB8VfKD1ftq1iZNGJYgedq
सहज सारथीसह आनंदी आयुष्याचा दिशेने तुमच्या प्रवासाला सुरवात करा. असेच सकारात्मक मार्गदर्शन आणि प्रेरणेसाठी आमचे पेज फॉलो आणि शेयर करा.
फेसबुक : https://www.facebook.com/sahajsarathihelp
युट्युब : https://youtube.com/?si=qvF_T9PpgMVZRwjp
इंस्टाग्राम : https://www.instagram.com/sahajsarathihelp/
संपर्क क्रमांक: +91 8689 8484 04 / 08
Email: [email protected]
धन्यवाद
सहज सारथी टीम.
www.sahajsarathi.in
Copyright © 2024 सहज सारथी - विनय वाघ. All rights reserved.