13/11/2022
लग्न झालेल्या स्त्रीसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार मानला आहे. उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्त्व आहे. भांगात सिंदूर भरणे, हे सौभाग्याचे लक्षण आहे. हे भेद देशकालपरत्वे आहेत. कुंकवामध्ये शक्ती असते. कुंकू लावणे, हे पूजा करणे, इतरांना सन्मानित करणे यांसारखे कर्म असल्याने कुंकू लावणार्या स्त्रीच्या बोटाला कुंकू लागल्याने कुंकूमधील चैतन्य आणि शक्ती कणांच्या रूपात हातातून देहात पसरते.